गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये दि. 25 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील सर्व दहा विभागांमध्ये विज्ञान विषयक प्रदर्शने भरवून दरवर्षीप्रमाणे नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी ती खुली करण्यात आली होती. या प्रदर्शनांमधून यावर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या ‘विकसित भारत’ या मुख्य विषयाला अनुसरून सर्व विभागांनी प्रयोग आणि सादरीकरणे केली आणि समाजामध्ये विविध
गोष्टींविषयी जागरूकता तसेच कुतूहल निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
प्रदर्शनामध्ये विकसित भारतीय मुख्य विषयाला धरून प्राणीशास्त्र विभागाने रेशीम उत्पादन, मधमाशी पालन, गांडूळ खत प्रकल्प या विषयावर तर वनस्पतीशास्त्र विभागाने वनीकरण प्रतिकृती, टसर रेशीम, समुद्री शैवालपासून रोजगार निर्मिती, आधुनिक बाग निर्मिती, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची बीज बँक, त्याचप्रमाणे वनस्पतीच्या टाकाऊ भागापासून टिकाऊ सुगंधी द्रव्यनिर्मिती अश्या शाश्वत विकासात्मक कृतींचे सादरीकरण केले. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विभागाने शालेय मुलांना विविध प्रयोग करून दाखवले आणि मूलभूत गोष्टी समजावून सांगितल्या. मुलांना ग्रह आणि ताऱ्यांच्या प्रतिकृती दाखवून माहिती समजावून सांगितली. जैवरसायनशास्त्र विभागाने जैविक गोष्टींचा वापर करून किण्वन पद्धतीने तयार केलेले अल्कोहोल, कोकम व रीठा यांचा चा वापर करून तयार केलेले हॅन्डवॉश व साबण, बीट आणि जास्वंदीचा रस वापरून तयार केलेले pH कागदप्रदर्शनात मांडले आणि ते बनवण्यामागची कार्यपद्धती समजावून सांगितली. जैवतंत्रज्ञान विभागाने पण्यावर होणारी शेती तसेच पाणी शुद्धीकरण करणाऱ्या मुळांची रचना प्रतिकृतीद्वारे सादर केली. सूक्ष्मजीवांची कार्यपद्धती व त्यातून माणसाला होणारे फायदे याबद्दल सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने सादरीकरण केले. गणित विभागाने भूमिती आणि गणितातील तत्त्वे आणि कोडी यांच्या साह्याने समजावून सांगितली. संगणक शास्त्र विभागाने दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तसेच खेळांच्या मदतीने विविध विषयांची माहिती सोपी करून सांगितली. माहिती तंत्रज्ञान विभागाने विविध प्रकारच्या सादरीकरणातून नावीन्य, सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान यांच्या सुरेख मिळेल साधला. आणि सायबर सिक्युरिटी संदर्भात महत्त्वाचे सादरीकरण केले. सर्व प्रदर्शनांना शहरातील जी जी पी एस, पटवर्धन हायस्कूल, नाईक हायस्कूल,शिर्के हायस्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल इत्यादी शाळांतील सुमारे १५०० विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील शास्त्र वाणिज्य आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी आणि
शिक्षकांनी भेट दिली.
दि. २८ फेब्रुवारी रोजी स्व. अरुअप्पा जोशी स्मृतिदिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम राधाबाई शेट्ये सभागृह येथे संपन्न झाला. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपप्राचार्या विज्ञान शाखा डॉ. अपर्णा कुलकर्णी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात विभागात विशेष कामगिरी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. प्रा. श्रावणी केतकर यांनी बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन केले. २५ तारखेला झालेल्या सर्व प्रदर्शनाचे आयोजन आपली विद्यार्थी मंडळ सचिव मिहीका केनवडेकरच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम
पद्धतीने पार पडल्याबद्दल उपप्राचार्या तसेच प्राचार्यांनी सर्व विभागांचे कौतुक केले आणि सादरीकरणासाठी दाखवलेल्या उत्साहाला दाद दिली. तसेच उत्कृष्ट
व्यवस्थापनाबद्दल प्रा. बाबासाहेब सुतार आणि त्यांच्या टीमचेही अभिनंदन केले.
विभागीय प्रदर्शनांचे मूल्यांकन करण्यासाठी महाविद्यालयाने नेमलेल्या परीक्षक समितीच्या निर्णयानुसार बक्षिसे देण्यात आली. यात सर्वसाधारण विजेतेपद संगणक
शास्त्र विभाग,नाविन्यासाठी जैवतंत्रज्ञान विभाग,संकल्पनेसाठी रसायनशास्त्र विभाग आणि सादरीकरणासाठीचे पारितोषिक सूक्ष्मजीवशास्त्र विभागाला मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. बाबासाहेब सुतार यांनी केले.
![]() |
![]() |
![]() |